गोली का जवाब तोफ गोले से देंगे : उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे* उपमुख्यमंत्री शिंदे, केद्रीयमंत्री जाधव यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण

गोली का जवाब तोफ गोले से देंगे : उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
*  उपमुख्यमंत्री शिंदे, केद्रीयमंत्री  जाधव यांच्याहस्ते  स्वामी विवेकानंद पुरस्काराचे वितरण


बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय सैनिक करत आहे. गोली का जवाब तोफ गोले से देंगे हा नवभारत आहे. आतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये, भारतीय लष्कराने सीमेवर चोख उत्तर देत दाखवून दिले की, आम्ही सज्ज आहे, असे प्रतिपादन 12 मे रोजी 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले.

           बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा 10 ते 18 मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संत चोखोबाच्या जन्मभुमी अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा धकधकता इतिहास कथण केल्या जात आहे. या कार्यक्रमा दरम्यान गिता परिवार संस्थेच्यावतीने निलेश महाराज झरेकरे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार हा गोविद देवगिरी महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
      यावेळी व्यासपिठावर आमादर संजय गायकवाड, श्वेताताई महाले,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,  ओमसिंग राजपूत, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के उपस्थित होत्या.  
        एकनाथ शिंदे पुढे म्हणले की,  अडचणीत सापडल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. यापुढेही मी समाजाच्या प्रत्येक कामासाठी सदैव तयार राहील, आम्ही टीम म्हणून काम करत आहोत आणि यापुढे करत राहणार आहेत. लाडकी बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांनी भरभरून मतदान ने केले, त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो. लडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले.  धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या लष्कराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथे आपल्या बहिणीचं कुकं पुसणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबल्याचे सांगितले. पुढे बोलतांना म्हणाले की, संतांचा वारसा समाज प्रबोधनाचे काम वारकरी संप्रदाय करत आला आहे. त्यामुळेच आपण या संत परंपरेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे आल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.