* काँग्रेस पक्षवाढीसाठी अहोरात्र झटणार : संदिपदादा शेळके
चिखली : (एशिया मंच न्यूज )
माजी आमदार दिवंगत बाबुराव पाटील, उत्तमराव पाटील यांचा नातू असल्यामुळे जुन्या विचारांशी, पक्षाशी मी पुन्हा जुळलो. मला लोक विचारतात की, तुम्ही आता जिल्हाध्यक्ष होणार का ? मी सर्वांना ठामपणे सांगत आहे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या आदेशाने मी संवाद यात्रा सुरु केली असून मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, फक्त काँग्रेस पक्ष वाढीसाठीच अहोरात्र झटणार, असल्याचा निर्धार काँग्रेसनेते संदिपदादा शेळके यांनी व्यक्त केला.
बुधवार २५ मार्च रोजी चिखली येथील हिरकणी महिला अर्बनमध्ये तालुकानिहाय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना संदिपदादा शेळके म्हणाले की, लोक मला विचारत आहेत, तुमच्या बॅंका आहेत, त्रास होणार नाही का ? तर मी त्यांना सांगतो की, आमच्या पूर्वजांनी इंग्रज राजवटी सारखा कठीण त्रास सोसला. आता तर सर्व सुविधा आहेत. त्यामुळे जेलमध्ये जावे लागले, तरी चालेल पण काँग्रेस विचार सोडणार नाही.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, न.प.विरोधी पक्षनेते डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, अतहरोद्यीन काझी, पर्यावरण सेलचे विजु पाटील शेजोळ, नगरसेवक गोपाल देव्हडे, जक्का भाई, गोकुळ शिंगणे, रत्नदिप शिनगारे, प्रशांत भटकर, समाधान सुपेकर, पांडुरंग पाटील भुतेकर, खलील बागवान, शेख खैरू, ईश्वराव इंगळे, जिवनबापु देशमुख, शिवराज पाटील, शेषराव अंभोरे, अशोक झगरे, रामधन मोरे, कापडसिंग पाटील, गणेश जवंजाळ, समाधान आकाळ, गणेश ठेंग, विजय वाघमारे सर, भास्कर चांदोरे, समाधान गिते, प्रविण, पाटील, राहुल चवरे, डॉ. संजय घुगे, रवि लोखंडे, संजुकाका बाहेकर, रूपेश घोलप, विजय महाजन, श्रीकृष्ण अंभोरे यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
