विधवा पुनर्विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध ; मानस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम



विधवा पुनर्विवाह सोहळ्यात  पाच जोडपी विवाहबद्ध  ;  मानस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        समाजातील विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी सुरू असलेल्या चळवळीने वेग घेतला.

       मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने  शहरात 27 सप्टेंबर रोजी पाचव्यांदा विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित करण्यात आला. या अनोख्या सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध झाली. आतापर्यंत अशा पाच सोहळ्यांत 115 जोडप्यांनी नवजीवनाची सुरुवात केली असून, त्यांचे संसार आता सुखसमृद्धपणे सुरू आहेत. 
        प्रा. डी. एस. लहाने यांनी स्थापन केलेल्या मानस फाउंडेशनने  विधवा पुनर्विवाहाबाबत केवळ विवाह नाही, तर रोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. राज्यभरात ही चळवळ पसरत असून, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, स्वयंरोजगार योजना आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते. आजच्या विवाह सोहळ्यात पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड प्रमुख अथिती  होते.