कलंकित मंत्र्यांची हकालपट्टीसाठी उबाठाचे बुलढाण्यात ’जनआक्रोश आंदोलन’* कलापथक अन् प्रतीकात्मक जिवंत देखावे ठरले लक्षवेधक

कलंकित मंत्र्यांची हकालपट्टीसाठी उबाठाचे बुलढाण्यात ’जनआक्रोश आंदोलन’
* कलापथक अन् प्रतीकात्मक जिवंत देखावे ठरले लक्षवेधक 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       राज्यातील महायुतीच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या व भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने 11 ऑगस्ट रोजी जनआक्रोश आंदोलन बुलढाण्यात करण्यात आले. स्थानिक जिजामाता प्रेक्षगार मैदानाच्या परिसरात धरणे आंदोलनातून, निदर्शनातून भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, या मागणीची घोषणाबाजी करण्यात आली.

       या धरणे आंदोलनात रमी खेळणारा कृषी मंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार, पैशाचा बॅग शेजारी ठेऊन घरात बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री, सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक प्रतिकात्मक जिवंत देखावे या आंदोलनातील देखावे लक्षवेधक ठरले. यावेळी पदाधिकारी, नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आपल्या भाषणाच्या शैलीतून हल्ला चढविला. सदर आंदोलनाची सुरुवात जय, जय महाराष्ट्र  माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र  गीताने झाली. कलापथकांनी सादर केलेल्या दोन दिवसाची दुनिया पाहू द्या, आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या, अशा प्रकारच्या गीतांनी शेतकऱ्याची व्यथा मांडली. जिल्हाभरातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

* सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करणार  : आ. सिद्धार्थ खरात
       हे शासन फसवेगिरी करून सत्तेवर आलेले आहे. खोटे आमिष देऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांनी प्रगती, विकास यावर काम करायच सोडून मंत्री काय करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळतो, मग म्हणतो शासन भिकारी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रातीला थोर परंपरा लाभलेली आहे. अशा असताना या महाराष्ट्रातील मंत्री कलंक लावण्याचे काम करत आहेत. भ्रष्टाचार करायचा आणि पैसे कमवायचे हाच उद्योग सुरू आहे. या आंदोलनात दाखवलेल्या प्रतिकात्मक देखाव्यांनी मंत्री कसे काम करत आहेत हे पुन्हा एकदा जिवंत झाले. आंदोलनाची ही सुरुवात आहे.

        शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करून हे शेतकरी विरोधी सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.

राज्यातील मंत्र्यांच्या खराब प्रतिमेमुळे महाराष्ट्र रसळतला : जयश्रीताई शेळके
        आपला महाराष्ट्र राज्य महान आहे, हे आपण देशात अभिमानानाने सांगतो. त्याच आपल्या राज्याचे मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात, मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतात, एक, एक कारनामे या सरकारचे बाहेर येत आहेत. एकपेक्षा एक वरचढ, असे त्यांचे कारणामे आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार सर्व सामान्य माणसावर बॉक्सिंग स्कील दाखवत मारहाण करत, कॅन्टीन केसरी म्हणून मिरवतात. तरी देखील राजीनामे घेतले जात नाहीत.
       राज्याची प्रतिमा रसळतला नेल्या जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. लाडक्या बहिणीच्या निधीला कट लावण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने झोपेच सोंग घेतले असल्याची टीका राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली.

* निवडणूक पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा महायुतीला विसर  : जालिंदर बुधवत
           शेतकऱ्यांनी न मागता ही दोन लाख रुपयांची कर्जमाफी देणारे उद्धव साहेब हेच एकमेव शब्द पाळणारे नेते आहेत. शिवसेना ही कायम समाजासोबत राहत आलेली आहे. कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी या आंदोलनाबाबत आदेश दिले आणि आज राज्यभर हा वनवा आंदोलनाच्या रूपातून पेटत आहे.
मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्यांचे प्रश्न जैसे थे, असताना राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यसहित भ्रष्टाचाराचा कलंक गाठला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत आहे. पीक कर्जाचे नुसते आश्वासन सरकारने दिले. निवडणूक पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सत्तेत येताच महायुती सरकारमधील पक्षांना विसर पडला आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यावेळी म्हणाले.

        यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ, जिल्हा सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने, महिला जिल्हाप्रमुख चंदाताई बडे, महिला जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, बुलढाणा जिल्हा समन्वयक संदिपदादा शेळके, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, विधानसभा संघटक सुनील घाटे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, उपजिल्हाप्रमुख बद्रि बोडखे, उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख विजय इतवारे, तालुका प्रमुख विजुभाऊ इंगळे, तालुका प्रमुख किसन धोंडगे, तालुका प्रमुख राजू बुधवत, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, तालुका प्रमुख श्रीराम खेलदार, तालुका प्रमुख दीपक चांभारे, गजानन बिलोकर,  सुधाकर आघाव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे, युवा सेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, शेख रफिक, अनिकेत गवई, भीमराव पाटील, शुभम घोंगटे, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षा पिंपळे, दिपाली पाटील,  गजानन धांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.