* शिवसाईमध्ये अवतरली पंढरीची वारी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला हरी ओम विठ्ठला, रामकृष्ण हरी, विठुरायाच्या नामघोषात अवघा महाराष्ट्राच नव्हे तर अवघा आसमंत दणाणून निघतो. शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कुल चे विद्यार्थी आज सकाळीच विठ्ठल-रुक्माई व वारकऱ्याच्या वेशभूषेत तयार होऊन शाळेमध्ये उपस्थित होते. शिवसाई ज्ञानपीठ चा परिसर टाळ व मृदुंगाच्या निनादाने मंत्रमुग्ध झाला होता. दरवर्षी प्रमाणे शिवसाईचे विद्यार्थी वारकरी व विठ्ठल -रुखमाईच्या, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव , संत एकनाथ महाराज ईत्यादी संतांच्या वेशभूषेत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी देखील पालकांच्या सहकार्याने वर्ग नर्सरी, ज्युनिअर व सीनिअर केजीचे चिमुकले विविध वेशभूषेत पादचाऱ्यांना आकर्षित करत होते, तसेच वारीमध्ये शिस्तीचे दर्शन घडत होते. यावेळी भूषण कानडजे, ऋषिकेश टेकाळे, धनंजय उबरहंडे, श्रीराज पोफळे, विवेक भुसारी यांनी शिस्तीची कमान क्रिडा शिक्षक सागर उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वर्ग १ ली ते १० वी चे जवळपास एक हजार, तीनशे विद्यार्थी पायी दिंडीवारी मध्ये विविध देखावे सादर करीत विठुरायाचा नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंग रस्त्याने पावली, फुगडी खेळत उपस्थितांची वाहवा मिळवत होते. वर्ग 4 थी व 6 वी च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले यामध्ये अर्चना हिवाळे व सिमा बोदडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विठ्ठलाच्या वेशभूषेत ईश्वरी डुकरे, पार्थ मोहरकर, शौर्या हिवाळे, तर पालखीची धुरा ओमकार वाघ , जीवक धुरंधर यांनी सांभाळली. पालखी मध्ये विठ्ठल रुखमाई मोठया दिमाखात शोभून दिसत होती.
सकाळीच वरुण राजा प्रसन्न झाले होते. परंतू विद्यार्थ्यांचा उत्साह व पालकांचे सहकार्य व शिक्षकांची खंबिर साथ असल्यामुळे पायी दिंडीचे यशस्वी आयोजन झाले. दिंडी सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुषांची संख्या वाखण्याजोगी होती. ठीक ठिकाणी महिलांनी पालखीचे स्वागत केले व शुभेच्छा देत विठूरायाच्या नावाचा जयघोष केला. शिवसाईच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिताना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सदर पायी दिंडी वारी तुळशी नगर परिसर परिसर ते एच.डी.एफ.सी. चौक, चिंचोले चौक, राम नगर व परत शिवसाई ज्ञानपीठ मध्ये समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी शिवसाई परिवाराचे सर्वेसर्वा डी.एस. लहाने, सौ. मीनाताई लहाने संचालिका शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था आवर्जून उपस्थित होत्या. एकादशीचे महत्व सांगत आपण सर्वांनी भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या आई वडिलांची सेवा करा, असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत संस्कार ज्ञान देखील महत्वाचे आहे, असे प्रतिपादन केले. प्राचार्य प्रमोद मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना एकतेचा संदेश देत सांघिक कार्याचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक डी. बी. मोहरकर, पुष्पा गायकवाड, अपेक्षा मुळे, भागवत उबरहंडे, अश्विनी बंगाळे, तथा शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल स्कूलचे महिला शिक्षिका व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांना लाडु व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.